Search This Blog

Tuesday, July 6, 2010

भारत बंद !

केला कुणी आज बंद
आहे नुसतीच ब्याद ।
जन मानसाच्या मनी
काय तयाचा आल्हाद ॥

काढली रे कुणी आज
सरकारची या कळ ।
बस फोडी, ट्रेन रोखी
सारा सावळा गोंधळ ॥

म्हणे आम्ही कार्यकर्ते
देशाची या चिंता वाहु ।
किती दूर गाव माझा
बस बंद कसा जाऊ ॥

झाला बंद जो यशस्वी
श्रेया साठी चढाओढ ।
जनतेच्या व्यथा लाख
त्याची कुणाला त्या चाड ॥

No comments:

Post a Comment