राया माझा सरदार
शिवरायांच्या पदरी ।
गेला मोहिमी कधिचा
प्रिया तुझी वाट पाही ॥ १ ॥
वेढा पन्हाळी पडला
बाळ माझा अडकला ।
काळजाला थार नाही
जिजाऊ ही वाट पाही ॥ २ ॥
जणु वणवा पेटला
जीव कासावीस झाला ।
खग चातक कधिचा
पावसाची वाट पाही ॥ ३ ॥
फिरे रानोवनी माय
टिपायाला दाना-पाणी ।
कोटरांत चिव-चिव
पिलं तुझी वाट पाही ॥ ४ ॥
आंग्ल लचके तोडीती
सारा मुलुख लुटती ।
दीनवाणी हिंद माता
स्वातंत्र्याची वाट पाही ॥ ५ ॥
किती चाललो फिरलो
शिणलो परी नाही ।
वाट पंढरीची माझी
विठामाई वाट पाही ॥ ६ ॥
Some experiences, some memories, some thoughts and what not ... trying to capture here, whatever came to my mind. Hope you find it interesting :)
Search This Blog
Friday, July 9, 2010
Tuesday, July 6, 2010
भारत बंद !
केला कुणी आज बंद
आहे नुसतीच ब्याद ।
जन मानसाच्या मनी
काय तयाचा आल्हाद ॥
काढली रे कुणी आज
सरकारची या कळ ।
बस फोडी, ट्रेन रोखी
सारा सावळा गोंधळ ॥
म्हणे आम्ही कार्यकर्ते
देशाची या चिंता वाहु ।
किती दूर गाव माझा
बस बंद कसा जाऊ ॥
झाला बंद जो यशस्वी
श्रेया साठी चढाओढ ।
जनतेच्या व्यथा लाख
त्याची कुणाला त्या चाड ॥
आहे नुसतीच ब्याद ।
जन मानसाच्या मनी
काय तयाचा आल्हाद ॥
काढली रे कुणी आज
सरकारची या कळ ।
बस फोडी, ट्रेन रोखी
सारा सावळा गोंधळ ॥
म्हणे आम्ही कार्यकर्ते
देशाची या चिंता वाहु ।
किती दूर गाव माझा
बस बंद कसा जाऊ ॥
झाला बंद जो यशस्वी
श्रेया साठी चढाओढ ।
जनतेच्या व्यथा लाख
त्याची कुणाला त्या चाड ॥
Subscribe to:
Posts (Atom)